हात उगारण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी असतात, हे तत्व जो समाज अंगीकारतो, त्याच समाजाला आपल्या विभागाचा... आपल्या गावाचा... आपल्या शहराचा.. आपल्या जिल्ह्याचा अन् आपल्या देशाचाही विकास साधता येतो. कारण, देश म्हणजे काय तर केवळ नकाशाच्या आखलेल्या रेषा नव्हे तर देश म्हणजे माणसांच्या जीवंतपणाचे लक्षण; देश म्हणजे साामाजिक सौहार्दाचे वचन अन् देश म्हणजे जित्या-जागत्या माणुसकीचे दर्शन! हीच धारणा ठेवून पाचपाखाडीसारख्या कधीकाळी शहरावरुन ओवाळून टाकलेल्या अन् अत्यंत मागास असलेल्या विभागात 1979 मध्ये काही तरुण एकत्र आले. नरवीर तानाजी मालुसरेंनी आपले हात केवळ वैर्याला मारण्यासाठी नव्हे तर स्वराज्य उभारण्यासाठी उगारले होते; याची जाणीव असलेल्या या तरुणांनी त्यांच्याच नावाने एकत्र येण्याचा चंग बांधला अन् त्यातून साकारले नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ!
READ MORE1979 मध्ये काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली. आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे. अर्थात, त्यामागे अविरतपणे झिजणार्या कार्यकर्त्यांची अन् त्यांना ऊर्जा प्रदान करणार्या महनिय व्यक्तींची ताकद आहे. त्यामुळेच आजही हा उत्सव मोठ्या दिमाखात अन् जल्लोषात पार पाडला जात आहे.
READ MOREगेली 43 वर्षे साजरा होणार्या या गणेशोत्सवाच्या आठवणी आम्हा कार्यकर्त्यांनी काळजात कोरुन ठेवल्या आहेतच; शिवाय, चित्ररुपानेही त्या जतन करुन ठेवल्या आहेत...
View MoreThanyacha Raja Special
Thanyacha Raja Promo
View More सन 1979 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने एकत्र आलेल्या त्यावेळच्या तरुणांमध्ये जनसेवेचा ध्यास होता. किंबहुना, सामाजिक अभिसरणासाठीच हे तरुण एकत्र आले होते. त्यामुळेच नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सामाजिक कार्यामध्येही आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे रक्तदान असो अगर कोणती आपत्ती आमचे मंडळ हिरीरीने पुढे येत असते. अर्थात, मेहनतीची तयारी तरुणांची आाहेच; पण, पैशाचे सोंग आणणार कुठून?
नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आपणही सहभाग नोंदवावा, असे वाटत असेल तर आपण आम्हाला अर्थसाह्य करुन आमचे हात बळकट करा....
नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
पांचपाखाडी, ठाणे (पश्चिम) - ४००६०२
- ०२२ २५३४ ८२८२, २५३४ ६९६९